लेख क्र. ४ आयुष्यातील सुख आणि दु:ख
आयुष्यातील सर्वात महत्वाचे हे दोन शब्द असे की त्यांच्या पासून आपल्या आयुष्याला एक
नवीन वळण मिळत. ह्या दोन शब्दांपासून आयुष्यात एक नवीन उमेद किंवा निराशा बघण्यास मिळते. उमेद आणि निराशा या
दोघांचा सह संबंध म्हणजे सुख आणि दुःख.
सुख आणि दुःख हे दोन शब्द मानवाच्या आयुष्यात मागे पुढे येत असतात. दुःखात मानवाला
काही तरी नवीन करून दाखवण्याची जिद्द निर्माण करून देण्यास प्रोचाहान देते. ते कसे हा तुम्हाला आता प्रश्न
पडला असेल किंवा नसेल ही पडला. पण जरी पडला तर त्यांच्या साठी, की आयुष्यात दुःख मिळाल्या वर काही तरी करून
दाखवण्याची जी जिद्द निर्माण होते ना, तो या आयुष्यातील हा जो एक टपा, म्हणजेच दुःख यांच्या मुळेच होते.
याच्या मुळे मानवाला काही तरी करून दाखवण्याची जिद्द निर्माण होते. ते असे की जेव्हा आपल्या आयुष्यात सुख
असत ना तेव्हा आपल्या आयुष्यात सर्व मिळाल्या सारखच वाटत शक्यतो. वाक्याच्या शेवटी शक्यतो लावण्याचं कारण
फक्त एवढच आहे की, आयुष्यात सर्वच मिळतच आस नाही. आयुष्यात प्रत्येक गोष्टीसाठी लढवच लागत. आयुष्यात दुःख
म्हणजेच अपयश मिळाल्यावर मानवाने खचून न जाता. काही तरी नवीन सुरु करून किंवा ज्या ठिकाणापासून तुम्हाला
अपयश मिळालं आहे, त्या पासून परत नवीन सुरुवात करून सुखासाठी परत आपली वाटचाल सुरुवात करणे, म्हणजे आयुष्य.
आयुष्यात सुख आणि दुःख हे दोन शब्द नसले, तर आपल्या आयुष्याला काही अर्थच उरणार नाही
ना. आपल संपूर्ण आयुष बदलून टाकण्याचा ताकद ठेवणारे हे दोन शब्द आहे. आपल्या आयुष्याला बदलून टाकण्याचा
प्रयत्न करत असतात. काही लोक आयुष्यात दुःख आले की संपूर्ण कचून जाने किंवा वाईट मार्गाला लागणे. किंवा
चुकीच्या पद्धतीने सुखच्या शोधत निघणे आणि आणखी अटकून जाणे, आणि परत आयुष्याला दोष देणे आणि त्याच सर्व खापर
आयुष्यावरच फोडणे. चुकीच्या मार्गाने चालून सुखाची अपेक्षा करणे. आणि ते सुख फक्त काही ठराविक वेळे साठीच
मर्यादित असत. आणि त्या सुखात कदाचितच तुम्हाला खर सुख मिळू पण देेईल, पण काही तरी मर्यादित वेळेसाठीच किंवा
मिळूच नाही शकणार. कारण चुकीच्या मार्गाने कमवलेल सुख हे फक्त क्षणिक(मर्यादित वेळ पूर्त) असत. थोड्या
सुखासाठी क्षणिक सुखाच्या आहारी जाणे कितपत योग्य आहे. सुख मिळवा, पण थोड्या आनंदासाठी थोड सुख मिळवण्या,
पेक्षा जास्त आनंदासाठी जास्त सुख मिळवाणा.
हे आयुष्य आहे. त्यात सुख आणि दुःख हे दोन शब्द येतीलच. जेव्हा आपल्या आयुष्यात हे दोन
शब्द नसतील ना. तेव्हा आपल आयुष्य संपलेल असेल. कारण जो पर्यंत जीवंत आहे, तो पर्यंत सुख आणि दुःख हे आपला
पाठलाग करणार. आणि तरच आपल्याला जगण्याची नवीन उमेद मिळेल.
सुख आणि दुःख हे शब्दात माडण्या सारखी गोष्ट नाही. पण मी ते तोडक्या-मोडक्या माडण्याचा
प्रयत्न केला आहे. कारण हे प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळ्या पद्धतीने येत असत आणि प्रत्येक जण त्याला
वेगवेगळ्या पद्धतीने सामोरे जात असत.